#हिंगोलीमध्ये दिवसाची सुरुवातच जोरदार पावसाने झाली.मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, पावसाच्या वातावरणाचा जोर कायम आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये तूर कापणी केली मात्र पावसामुळे नुकसान झाले .हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी धास्तावला आहे.अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.हजारो शेतकऱ्यांची तूर सध्या शेतात पडून आहे.गारपिटीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.